Saturday, February 5, 2011

सिद्धिविनायक | सिद्धटेक Siddhi Vinayak | Siddhatek अष्टविनायक दर्शन माहिती


भीमा नदीच्या काठचे सिद्धटेक हे अगदी जंगलभागात आहे. ते एक लहानसे कुग्राम आहे. तेथे जाण्यासाठी पक्की सडक नाही. जवलपास कुठे रेल्वेमार्गही नाही. ह्या गावात अजूनही बिजलीची सोय झालेली नसल्यामुळे कंदिलाच्या प्रकाशातच आपले सारे व्यवहार उरकावे लागतात.
श्रीसिद्धिविनायकाचे मंदिर टेकडीवर उत्तराभिमुख असे आहे. वेशीपासून मंदिरापर्यंत सरदार हरिपंत फडके यांनी बांधलेला फरशीचा मार्ग आहे. मंदिरातील गाभारा पंधरा फूट लांबीचा आणि दहा फूट रुंदीचा असा आहे. देवाचे मखर पितळेच असूनदोन्ही बाजूला जयविजय उभे आहेत. मधला गाभारा इंदूरच्या अहिल्याबाई होळकर यांनी बांधलेला आहे.
सिंहासन पाषाणाचे आहे. गाभाऱ्यातच देवाचे शेजघर आहे. बाहेरच्या बाजूला खुला सभामंडप आहे. पुढच्या बाजूला महाद्वार आणि त्यावर नगारखाना आहे. सकाळ, दुपार येथे चौघडा वाजत असतो. पेशवाईतले सरसेनापती हरिपंत फडके यांच्या स्मरणार्थ हा चौघडा वाजतो. त्यासाठी दरवर्षी सहाशे रुपयांचे वेतन कर्जतच्या ट्रेझरीतून दिले जाते. मंदिराच्या डाव्या बाजूला भीमा नदी ही दक्षिणेला वाह्ट असते. भीमानदीवर हरिपंत फडके यांनी घाट बांधला आहे. आणि तेथेच त्यांची समाधी आहे.
श्रीसिद्धिविनायकाची तीन फूट उंचीची मूर्ती ही स्वयंभू आहे. रुंदी अडीच फूट आहे. मूर्तीचे तोंड उत्तर दिशेला आहे.मूर्तीची सोंड ही उजव्या बाजूला वळलेली आहे. मांडी घातलेली आहे आणि मांडीवर ऋद्धिसिद्धि ह्या दोघी बसलेल्या आहेत. येथे देवाला प्रदक्षिणा घालण्याची पद्धत बरीच रूढ आहे.
मंदिराच्या पश्चिम बाजूला श्रीशिवाई देवीचे आणि महादेवाचे देऊळ आहे. त्याच बाजूला श्री. काकासाहेब गाडगीळ यांनी आपल्या मातोश्रीच्या स्मरणार्थ एक धर्मशाळा बांधलेली आहे.
प्राचीन काली मधु आणि कैटम अशा दोन राक्षसांनी सर्वांना अगदी त्राही भगवान करून सोडले होते. त्या दोन राक्षसांना निःपात करायला हवा होता. ते काम श्रीशंकराने शईविष्णूवर सोपविले. श्रीविष्णूने त्यासाठी श्रीगणेशाची सुद्धा उपासना करायला हवी होती. तशी उपासना करण्यासाठी एखाद्या सुयोग्य स्थळाची शोधाशोध करीत असताना श्रीविष्णु हा एका टेकडीवर येऊन पोचला. आणि त्या टेकडीवरच त्याने, ‘श्रीगणेशायनमः’ असा मंत्र म्हणत तपश्चर्या करावयाला आरंभ केला. श्रीविनायक विष्णुला प्रसन्न झाला आणि त्या दोन दैत्यांशी युद्ध करताना तुला विजय प्राप्त होईल असा अशिर्वाद त्याला दिला. श्रीविष्णूकडून त्या दैत्यांचा निःपात झाला. इथेच श्रीविष्णूला सिद्धी प्राप्त झाली. म्हणूनच ह्या स्थळाला सिद्धक्षेत्र अथवा सिद्धटेक हे नाव मिळाले. टेकडीवर देवालय उभारण्यात आले. आणि तेथे गंडकी शिलेची श्रीविनायकाची मूर्ती स्थापन करण्यात आली.
काही काळानंतर ते देवालय लुप्त झाले आणि तेथे टेकडीच उरली. त्या टेकडीवर गावातली गुरे चरण्यासाठी येऊ लागली. एक दिवस मोठा चमत्कार घडून आला. त्या टेकडीवर श्रीगजान प्रगट झालेले गुराख्यांना दिसून आले. मग काय ? गुराख्यांना फार आनंद झाला. ते गुराखी नित्यनेमाने भीमानदीवर स्नान करून बरोबर आनलेल्या शिदोरीचा त्या देवाला नैवेद्य दाखवू लागले.
नैवेद्य दाखवल्यानंतर मगच ते आपली कांदाभाकर खाऊ लागले. असा हा क्रम बरेच दिवस चालू होता. एक दिवस एका गुराख्याला दृष्टांत झाला. श्रीगजाननाने त्याला स्वप्नात येऊन सांगितलेकी, “गुराख्याने आज्ञा प्रमाण मानली. पुरोहित नावाच्या ब्राह्मणाकडून तो त्या देवाची पूजाअर्चा घू लागल. त्याच्याकडूनच आरती आणि नैवेद्य करवून घेऊ लागला.
भीमानदीच्या काठी, महर्षी व्यासांनी मोठा यज्ञ केला होता. ते स्थान येथून जवळच आहे. नदीचे पात्र उन्हाळ्यात कोरडे पडते त्यावेळी त्या यज्ञातील भस्म अजूनही दृष्टीस पडते.
शई सिद्धि विनायकाचे अत्यंत जागृत असे हे स्थान आहे.
सिद्धटेकी विनायक ।
सिद्धिदाता विघ्ननाशक ।
विष्णूही ज्याचा पूजक ।
त्यासि वंदन आदरे ॥

No comments:

Post a Comment